Dhanshri Shintre
भारतामध्ये सोन्याचे दागिने परंपरेचा भाग आहेत, लग्नानंतर अनेक महिला सोन्याचे मंगळसूत्र परिधान करतात.
लग्नानंतर महिलांना सोन्याचे दागिने घालण्याची आवड असते, मात्र हे दागिने मुख्यतः कमरेवरच्या भागापुरते मर्यादित असतात.
आज आम्ही सांगणार आहोत की पायाच्या बोटांमध्ये, विशेषतः अंगठ्यात, सोन्याचे दागिने का घालू नयेत.
सोनं देवी लक्ष्मीचे प्रतीक मानलं जातं, म्हणून भारतात ते पायात घालणं अपमानास्पद समजलं जातं.
अनेक ठिकाणी विश्वास आहे की पायात सोनं घातल्याने नकारात्मक ऊर्जा वाढते आणि जीवनावर वाईट परिणाम होतो.
पायात सोने न घालण्यामागे कारण आहे, ते शरीराच्या ऊर्जेच्या प्रवाहात अडथळा निर्माण करू शकते.
वैज्ञानिक मतानुसार सोने गरम धातू असल्याने ते पायात घातल्यास शरीराचे तापमान वाढून आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.