Surabhi Jayashree Jagdish
पहलगाम हल्ल्याचा बदला म्हणून भारताने पाकिस्तानमधील ९ दहशतवाद्यांच्या तळावर हल्ला केला. याला ऑपरेशन सिंदूर असे नाव देण्यात आलं.
सध्या परिस्थिती इतकी गंभीर आहे की, युद्ध भडकण्याची भीती आहे. १९७१ च्या युद्धानंतर प्रथमच, युद्ध परिस्थिती लक्षात घेऊन देशभरात मॉक ड्रिल आयोजित केलंय.
या मॉकड्रिल अंतर्गत देशाच्या विविध भागात ब्लॅकआउटची योजना आखण्यात आलीये.
१९७१ मध्ये झालेल्या भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान आग्र्यातही असाच एक ब्लॅकआउट झाला होता.
त्यावेळी ताजमहालला ताडपत्रीने पूर्णपणे झाकण्यात आलं होतं.
शत्रूच्या सैन्याला विमानातून ताजमहाल दिसू नये आणि त्यांनी हल्ला करू नये यासाठी ताजमहाल झाकण्यात आला होता.
त्यावेळी ताजमहाल केवळ ताडपत्री आणि गोणपाटाने झाकलेला नव्हता. तर त्याभोवती झाडांच्या फांद्या आणि झुडपं लावून त्याला जंगलासारखे स्वरूप देण्यात आलं होतं.