Surabhi Jayashree Jagdish
हिंदू धर्मात स्वयंपाकघराला केवळ अन्न तयार करण्याची जागा मानलं जात नाही, तर ते घरातील सर्वात पवित्र स्थान मानलं गेलंय. अशी मान्यता आहे की याठिकाणी माता अन्नपूर्णा यांचे वास असतो.
माता अन्नपूर्णा स्वयंपाक घरात समृद्धी, शांती आणि पोषणाचे आशीर्वाद देते. त्यामुळे स्वयंपाकघरात तयार होणारं प्रत्येक अन्न शुद्ध, सात्त्विक आणि नियमांचे पालन करून बनवलं पाहिजे.
रात्री मळलेले पीठ सकाळपर्यंत शिळं होतं. शास्त्रांनुसार असं पीठ तामसिक मानलं जातं. असे पीठ खाल्ल्याने नकारात्मक ऊर्जा, आळस, जडपणा, चिडचिड आणि राग वाढतो.
आपल्या घरातील स्वयंपाकघराला माता अन्नपूर्णेचे स्थान मानलं जातं. त्यामुळे अन्न तयार करताना शुद्धता, स्वच्छता आणि ताजेपणाचे विशेष भान ठेवणे आवश्यक आहे.
जेव्हा शिळ्या पिठापासून पोळ्या बनवल्या जातात, तेव्हा माता अन्नपूर्णा नाराज होतात आणि स्वयंपाकघरातील सकारात्मकता कमी होते.
ज्योतिषानुसार चपातीचा संबंध सूर्य आणि मंगळ ग्रहाशी मानला जातो. कारण चपातीला शरीराला ऊर्जा, शक्ती आणि तेज प्रदान करते. सूर्य हा जीवनशक्तीचा प्रतीक आहे, तर मंगळ उत्साह, धैर्य आणि कर्मशीलतेचा कारक आहे.
पण जेव्हा पीठ फ्रिजमध्ये ठेवून नंतर वापरलं जातं, तेव्हा ते शिळं होतं. ज्योतिषशास्त्रात शिळ्या पिठाचा संबंध राहूशी मानला जातो. राहू हा भ्रम, अस्थिरता, मानसिक गोंधळ आणि नकारात्मक विचारांचा कारक आहे.
धर्मसिंधु, निर्णयसिंधु आणि स्मृतिग्रंथांमध्ये लिहिलंय की, “रात्रौ संध्या समये च यत् भुक्तं तत् बासी भवति।” याचा अर्थ असा की, रात्री ठेवलेले अन्न किंवा पीठ सकाळपर्यंत शिळं मानलं जातं आणि त्यामुळे त्याचा वापर टाळावा.