ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
शिवलिंगावर संध्याकाळी जल अर्पण करु नये हे तुम्ही अनेकदा ऐकले असेल. पण तुम्हाला यामागील कारण माहित आहे का? जाणून घ्या.
धार्मिक श्रद्धेनुसार, सूर्यास्तानंतर शिवलिंगावर जल अर्पण करू नये.
असे म्हटले जाते की, संध्याकाळी म्हणजेच सूर्यास्तानंतर शिवलिंगावर जल अर्पण करणे अशुभ आहे.
हिंदू पुराणानुसार, सूर्यास्तानंतर मंत्र जपल्याशिवाय किंवा दिवा लावल्याशिवाय शिवलिंगावर जल अर्पण करू नये, कारण हा काळ भगवान शंकराचा विश्रांतीचा काळ मानला जातो.
कोणत्याही पूजेमध्ये सूर्य देव साक्षीदार असणे शुभ मानले जाते, त्यामुळे संध्याकाळी शिवलिंगाला जल अर्पण करण्यास अशुभ मानले जाते.
सूर्य संध्याकाळी मावळतो, म्हणून यावेळी शिवलिंगावर जल अर्पण केल्याने तुम्हाला विशेष लाभ मिळत नाही.
याशिवाय, अमावस्येच्या दिवशीही शिवलिंगावर जल अर्पण करू नये, कारण या दिवशी चंद्र दिसत नाही.