Manasvi Choudhary
हिंदू संस्कृतीमध्ये कन्यादानाला विशेष महत्व आहे.
हिंदू धर्मातील विवाहसोहळ्यात कन्यादानाचे अपरंपार महत्त्व आहे. हिंदू लग्नामध्ये एकूण २२ चरण असतात. यामधील कन्यादान अत्यंत महत्त्वाचा चरण आहे.
पुण्यवचनाच्या विधीपासून सुरू झालेला विवाहसोहळा कन्यादानाच्या विधीपर्यंत अर्थात प्रचंड भावनिक होतो.
वडील - मुलीचं नातं अधिक घट्ट करणारा आणि अधिक भावनिक असा कन्यादान विधी.
यामध्ये कन्यादान म्हणजे मुलगी दान केले जात नाही, तर अग्निला साक्षी ठेऊन आपल्या मुलीचे गोत्र दान करण्यात येते
मुलगी आपल्या माहेरचे अर्थात वडिलांच्या कुळाचे गोत्र सोडून आपल्या पतीच्या म्हणजेच नवऱ्याच्या वंशाचे गोत्र धारण करते. त्यामुळेच कन्यादानाला महत्त्व प्राप्त होते.