ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
पॅरिस ‘सिटी ऑफ लव्ह’ म्हणून हे शहर अनेकांच्या पसंतीचे आहे.
विशेष म्हणजे प्रेमीयुगलांमध्ये हे ठिकाणी खूप लोकप्रिय आहे.
तुम्हाला माहित आहे का आपल्या भारतात देखील असे एक शहर आहे, ज्याला ‘भारताचे पॅरिस’ म्हणून ओळखले जाते.
तुम्ही विचार करत असाल की असे कोणते शहर आहे. तसे तर भारतातील प्रत्येक शहराची एक खास ओळख आहे.
राजस्थान राज्यातील जयपूर जिल्ह्याला गुलाबी शहर म्हटले जाते. कारण इथे सगळं काही गुलाबी रंगाने बनलेले आहे.
जयपूरला भारताचे पॅरिस असेही म्हणतात. आधुनिक शैलीत बांधलेल्या सुंदर इमारती पाहून त्याला भारताचे पॅरिस म्हटले जाते.
जयपूरमधील सिटी पॅलेस, हवा महल, शीश महल, हे सर्व जयपूरमध्येच बांधलेले आहेत. जयपूरवर राज्य करणाऱ्या राजांनी हे बांधले होते.
जयरपूरही त्याच्या प्राचीन कला आणि पंरपरेसाठी संपूर्ण जगभर प्रसिद्ध आहे. पॅरिसमधील राजवाडे, बाजारपेठा प्रसिद्ध आहे.
जसे पॅरिस प्रेमींसाठी हनिमून डेस्टिनेशन आहे तसेच जयपूरही भारतात हनिमूनसाठी लोकप्रिय आहे.