Surabhi Jayashree Jagdish
धार्मिक मान्यतानुसार, भगवान शिवांना श्मशानाचं स्वामी मानलं जातं. कारण ते संहार आणि मोक्षाचे देवता आहेत. शिवजी सृष्टीचे संहारकर्ता आणि मोक्षदाता आहेत. म्हणूनच ते त्या ठिकाणी निवास करतात जिथे शरीराचा शेवट होतो.
स्मशानातील शिवमूर्ती असते याचा अर्थ असा की, जीवन नश्वर आहे. प्रत्येक गोष्ट एक दिवस संपणार आहे. त्यामुळे मोह-माया सोडून वैराग्याकडे वळावे.
भगवान शिव वैराग्य आणि शांततेचं प्रतीक आहेत. ते स्मशानात ध्यान आणि तपस्या करून क्षणिक सुखांचा त्याग करतात. त्यामुळे ते लोकांना अध्यात्मिक मार्ग दाखवतात.
शिवजी शरीरावर भस्म लावतात. हे भस्म जीवनाच्या नश्वरतेचं आणि शरीराच्या क्षणभंगुरतेचं प्रतीक मानलं जातं. यामुळे माणसाला जीवनाच्या सत्याची जाणीव होते.
स्मशान हे वैराग्याचं स्थान आहे. याठिकाणी सांसारिक बंधनं संपतात. शिवजी मोह-मायेतून मुक्त होण्याचा संदेश देतात.
शिवजींना भूतनाथ म्हणजे सर्व भूतांचे देव आणि महाकाल म्हणजे मृत्यूचे देव असंही म्हटलं जातं. त्यामुळे ते स्मशानातच निवास करतात.
स्मशानातील शिवप्रतिमा माणसाला हे स्मरण करून देते की, जीवनाचा अंतिम उद्देश मोक्ष प्राप्त करणं आहे. मोक्ष हा जीवनाचा खरा ध्येय मानला जातो. शिवमूर्ती अध्यात्मिक प्रेरणा देते.