ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
ज्या व्यक्तीला फाशीची शिक्षा होते त्या व्यक्तीचा फाशीच्या देण्याच्या दिवशीही काळजीपूर्वक विचार केला जातोय
फाशीसाठी वापरण्यात येणारा दोर हा वेताचा असतो.
हा दोर शिक्षा सुनावलेल्या व्यक्तीच्या गळ्याला काचू नये याची काळजी घेतात.
आरोपीच्या गळ्याला हा दोर लागू नये यासाठी हा फाशीचा दोर तब्बल ३-४ आठवडे लोण्यात बुडवून ठेवलेला असतो.
लोण्यामध्ये बुडवण्यामागचं कारण म्हणजे हा दोर मऊ व्हावा.
महाराष्ट्रातील माजी IPS रवींद्र पाटील यांनी एका पॉडकास्टमध्ये ही माहिती दिलीये.
पाटील यांच्या सांगण्यांनुसार, जल्लादाचं काम असतं की, त्याला आरोपीला अलगद फाशी द्याची आहे. त्यामुळे जल्लाद हा कठोर नसतो.