Surabhi Jayashree Jagdish
आपले आजी-आजोबा नेहमी रात्रीच्या वेळेस शिट्टी वाजवण्यास मनाई करतात. मान्यतेनुसार रात्री शिट्टी वाजवल्याने नकारात्मक शक्ती आकर्षित होतात.
असं म्हटलं जातं की, रात्रीच्या वेळेस शिट्टी वाजवणं म्हणजे अनोळखी संकटांना आमंत्रण देण्यासारखं असतं. त्यामुळे लोक याला धोकादायक समजतात.
रात्रीच्या वेळी शिट्टी वाजवली की धनहानी होते, असाही अनेकांचा समज आहे. यामुळे घरात अशांती निर्माण होऊ शकते. त्यामुळे ही कृती अशुभ मानली जाते.
रात्री शिट्टी वाजवणं हे अशुभ संकेत मानले जातात. तसंच यामुळे वातावरणात अस्थिरता वाढते. त्यामुळे मनःशांती भंग होते.
प्राचीन काळात शिट्टीचा आवाज हा इशारा किंवा धोक्याचा संकेत मानला जायचा. त्यामुळे रात्री शिट्टी वाजवणं हे संकटाचं लक्षण मानण्यात येतं. ही परंपरा आजही लोकमान्यतेत टिकून आहे.
रात्रीच्या शांततेत शिट्टीचा मोठा आवाज मनाची एकाग्रता भंग करतो. त्यामुळे मानसिक अस्वस्थता वाढते. यामुळे लोकांना त्रास होतो.
अशा प्रकारे रात्री शिट्टी वाजवण्याबाबत अनेक लोकमान्यता आहेत. या मान्यतांमुळे लोक आजही रात्री शिट्टी वाजवणं टाळतात.