Manasvi Choudhary
पाऊस कधी पडणार? याची शेतकऱ्यांना आतुरता असते. एप्रिल- मेच्या उन्हाची झळ सोसल्यानंतर शेतकरी पाऊसाची वाट पाहत असतो.
भारतीय संस्कृतीत निसर्गाला देव मानले जाते. पाऊसाला 'वरुण देव''इंद्र देव' म्हणतात. पाऊसाला सुरूवात झाली की शेतकरी वरूण देवाची पूजा करतात. गाणी म्हणतात.
पाऊस पडल्यानंतर शेतकऱ्याच्या आनंदाला पारावर राहत नाही. कारण पाऊस हा केवळ गारवा देत नाही शेतीसाठी महत्वाचा असतो.
पहिला पाऊस पडल्यानंतर शेतजमीन मऊ होते. मातीला छान सुंगध येतो. म्हणूनच, शेतात बी पेरण्यापूर्वी शेतकरी पावसाच्या पाण्याची आणि मातीची पूजा करतो, जेणेकरून जमिनीत टाकलेले प्रत्येक बी अंकुरित व्हावे आणि पीक चांगले यावे.
पावसाला सुरूवात झाल्यानंतर शेतकरी पेरणीच्या, नांगरणीच्या कामांना सुरूवात करतात. पावसाच्या पाण्यामुळे पिकांची वाढ जोमाने होते. पिके हिरवीगार दिसतात.
पाऊस पडल्यामुळे शेतातील विहिरी, तलावे, धरणे यामधील पाण्याची पातळी वाढते . केवळी पावसाळी नाहीतर वर्षभर पिकणाऱ्या धान्यांसाठी पाणी साठा होतो.