Manasvi Choudhary
महाराष्ट्र चंद्रपूर येथील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात वसलेले सातारा या गावाची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे.
आजकाल अनेक गावांमध्ये स्वच्छतेविषयी उपक्रम राबवले जातात.
असचं एका सातारा या गावाचं देखील उदाहरण आहे. केवळ स्वच्छताच नाही तर अनोख्या कृतीमुळे या गावाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतलं आहे.
या गावात केवळ स्वच्छताच महत्वाची नाही तर या गावात शिवीगाळ करणाऱ्या देखील कठोर शिक्षा दिली जाते.
शिवीगाळ करताना कोणीही आढळलं तर त्याच्याकडून ५०० रूपये दंड घेतला जातो.
यामुळेच साताऱ्यातील स्वच्छता आणि शिस्तबद्ध जीवनशैलीचे संपूर्ण देशभरत कौतुक केले जात आहे.