Saam Tv
एखाद गाणं एकदा ऐकलं की बास मग ते आपण दिवसभर गुणगुणत असतो. आपल्या कळत नकळत ते गाण आपल्या ओठांवर राहून जातं. पण हे का होत? याचा केव्हा विचार केलाय का? जाणून घ्या यामागचं भन्नाट कारण
एखादं गाणं कायम गुणगुणत राहण्याच्या त्या प्रसंगाला किंवा अनुभवाला EARWORM म्हणतात. अशा वेळी गाणं ऐकणंच गरजेचं नसून दुसऱ्याने गुणगुणलेले गाणही आपल्या लक्षात राहतं.
ज्या गाण्यांची धुन, ठेका किंवा शब्द सहज लक्षात राहतात. अशी गाणी मेंदूमध्ये रेंगाळत बसतात. म्हणूनच काही गाणी ऐकल्यावर बराच वेळ डोक्यात सुरू राहतात.
कधी कधी गाणं पुर्ण ऐकण्याची गरज नसते. अर्धवट ऐकले तरी त्याची ती अर्धी धुन कायम डोक्यात राहते. केव्हा केव्हा मेंदू ते अर्धवट गाणं पूर्ण करत असतो. त्याला लूप मोड म्हणतात.
एखादं गाणं एखाद्या व्यक्तीशी, ठिकाणाशी किंवा जुन्या आठवणीशी जोडलेलं असत. तेच गाणं पुन्हा ऐकल्यावर आठवणी जाग्या होतात. त्यामुळे गाणं डोक्यात रेंगाळतं.
आपण पुर्णपणे रिकामी बसलेले असतो. डोक्यात कोणतेच विचार नसतात. अशावेळी मेंदू स्वता:ला व्यस्त ठेवण्यासाठी गाणी गुणगुणतो.
केव्हा केव्हा आपल्याला ते गाणे आवडत देखील नसते. पण त्याची धुन मनात राहते. त्यामुळे ते गाणे आपण गुणगुणतो.
समोरचा माणूस गाणे गुणगुणत असेल तर केव्हा केव्हा ती vibe आपल्या मेंदूपर्यंत पोहोचते. म्हणून काही काळानंतर आपण ते गाणे गुणगुणतो.