ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
उन्हाळा सुरु झाला म्हणजे आंब्याचा सीझन सुरु झाला.
आंबा हा वर्षातून एकदाच खायला मिळतो. लोक उन्हाळ्याचे चार महिने मनोसोक्त आंबा खातात.
आंबा हा वर्षातून एकदाच का येतो? हा प्रश्न तुम्हालाही पडलाय का
आंब्याच्या झाडाला एका विशिष्ट ऋतूतच बहर येतो.
उन्हाळ्यात या झाडाला पोषक वातावरण असते त्यामुळे आंबा येतो.
हवामानातील बदल आणि तापमान वाढल्यामुळे आंब्यावर परिणाम होतो.
परंतु आंब्याच्या काही प्रजाती या वर्षभर असतात. परदेशात अनेक ठिकाणी तुम्हाला वर्षभर आंबा खायला मिळेल.
आंब्याच्या झाडाला वर्षभर बहर येण्यासाठी विशेष तंत्रज्ञानाचा वापर केला जातो.
परंतु भारतात नैसर्गिकरित्या फक्त उन्हाळ्यातच आंबा पिकतो.
ही माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. साम टीव्ही याचे समर्थन करत नाही.