Surabhi Jayashree Jagdish
छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगड किल्ला आपल्या स्वराज्याची राजधानी म्हणून निवडण्याचा निर्णय अतिशय काळजीपूर्वक आणि दूरदृष्टीने घेतला होता.
हा निर्णय शिवरायांच्या राजकीय बुद्धिमत्तेचे आणि स्वराज्याच्या भविष्यातील दृष्टीकोनाचे प्रतीक आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगड किल्ला राजधानी म्हणून निवडण्यामागील कारणं काय आहेत ती जाणून घेऊया.
रायगड हा किल्ला सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये समुद्रसपाटीपासून सुमारे ८२० मीटर उंचीवर वसलेला आहे.
त्याच्या भौगोलिक रचनेमुळे हा किल्ला अत्यंत मजबूत आणि दुर्गम होता. शत्रूंसाठी येथे पोहोचणे अत्यंत कठीण होते.
रायगड किल्ला मराठ्यांच्या स्वराज्याच्या मध्यवर्ती भागात होता. या ठिकाणहून सर्व दिशांना आपल्या प्रदेशावर नजर ठेवणं शक्य होतं.
रायगड किल्ल्यावर पाण्याच्या विहीरी आणि अन्नधान्याचे गोदाम होते. त्यामुळे दीर्घकाळ शत्रूंचा सामना करण्याची क्षमता या किल्ल्याला होती.
रायगड हा केवळ एक किल्ला नव्हता, तर तो मराठा स्वराज्याचा प्रतीक होता. याचठिकाणमी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला होता.