Tanvi Pol
महाराष्ट्र राज्यात सातारा जिल्हा अनेक ऐतिहासिक गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे.
पण याच सातारा जिल्ह्यातील एक गाव आहे जे सैनिकांचं गाव म्हणून ओळखलं जातं.
चला तर जाणून घ्या सातारा जिल्ह्यातील कोणते गाव आहे हे.
सातारामधील अपशिंगे हे गाव सैनिकांचं गाव म्हणून देशभर प्रसिद्ध आहे.
साताऱ्यामधील हे एक लहानसं गाव आहे, पण याच मातीने देशाला शेकडो वीर दिलेत.
विशेष म्हणजे या गावातील २ हजारांहून अधिक सैनिक आहेत.
म्हणूनच साताऱ्यामधील या गावाला मिलिटरी अपशिंगे म्हणून ओळखलं जातं.