Tanvi Pol
पंढरपूरची वारी ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, धार्मिक आणि सामाजिक जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे.
दरवर्षी आषाढी एकादशीला लाखो वारकरी विठोबाच्या दर्शनासाठी पंढरपूरच्या दिशेने पायी चालत निघतात
वारीत महिला, पुरुष, वृद्ध, आणि लहान मुलेही सहभागी होतात.
पंढरपूरच्या रस्त्यांवर, मंदिर परिसरात, चंद्रभागा नदीच्या घाटांवर, बाजारात आणि गावाच्या प्रत्येक गल्लीबोळात भाविकांची तुफान गर्दी पाहायला मिळते
पण या अद्वितीय परंपरेची सुरुवात नेमकी कोणी केली, हा प्रश्न अनेकांच्या मनात येतो.
वारीची सुरुवात मुख्यत संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या दिंड्यांपासून झाल्याचे मानले जाते
यामुळेच वारकरी संप्रदायामध्ये या दोन संतांचा विशेष सन्मान आहे.