Mahabharata: महाभारतात शकुनीचा वध कोणी केला?

Surabhi Jayashree Jagdish

शकुनी कोण होता?

शकुनी हा गांधार राज्याचा राजा आणि गांधारीचा भाऊ होता. तो दुर्योधनाचा मामा असल्याने कौरवांवर त्याचा मोठा प्रभाव होता. आपल्या कुटिल बुद्धी आणि राजकारणामुळे तो महाभारतातील महत्त्वाचा पात्र मानला जातो.

Shakuni death | saam tv

महाभारतातील त्याची भूमिका

दुर्योधनाच्या अनेक कारस्थानांमागे शकुनीचा सल्ला आणि डावपेच होते. पांडवांविरुद्ध वैर निर्माण करण्यात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली. त्यामुळे कौरव आणि पांडव यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र होत गेला.

Who killed Shakuni | saam tv

सहदेवाशी युद्ध

महाभारताच्या शेवटच्या टप्प्यात शकुनीचा सामना पांडवांपैकी सहदेवाशी झाला. हे युद्ध अत्यंत निर्णायक मानलं गेलं. सहदेवाने शांतपणे पण पराक्रमाने शकुनीला प्रत्युत्तर दिलं.

Kurukshetra war | saam tv

उलूकाचा वध

युद्धादरम्यान सहदेवाने सर्वप्रथम शकुनीचा पुत्र उलूक याचा वध केला. आपल्या मुलाचा मृत्यू पाहून शकुनी हादरून गेला. त्यामुळे त्याचे मनोधैर्य मोठ्या प्रमाणात खचलं.

Gandhara king | saam tv

शकुनीचा वध

पुत्राच्या मृत्यूनंतर शकुनी रणांगणातून माघार घेण्याचा प्रयत्न करू लागला. मात्र सहदेवाने त्याचा पाठलाग करून त्याला गाठलं. त्यानंतर सहदेवाने शकुनीचा वध करून प्रतिज्ञा पूर्ण केली.

Mahabharata war | saam tv

शकुनीचा मृत्यू कधी झाला?

शकुनीचा मृत्यू महाभारत युद्धाच्या १८व्या आणि अंतिम दिवशी झाला. त्याच्या मृत्यूनंतर कौरवांची उरलेली शक्ती आणखी कमकुवत झाली. त्यानंतर युद्धाचा शेवट निश्चित झाला.

Kauravas | saam tv

युद्धानंतर कोण जिवंत राहिले?

महाभारत युद्ध संपल्यानंतर युधिष्ठिर, अर्जुन, भीम, नकुल, सहदेव, श्रीकृष्ण, सात्यकी, कृपाचार्य, कृतवर्मा, अश्वत्थामा आणि युयुत्सु हे प्रमुख योद्धे जिवंत राहिले. तसंच युद्धात सहभागी नसलेले विदुर, संजय, धृतराष्ट्र, गांधारी आणि कुंती हेही जिवंत होते.

Mahabharata characters | saam tv

Heart attack symptoms: 1 महिना अगोदर ही 5 लक्षणं दिसली तर समजा हार्ट अटॅक येणारे!

Silent heart attack | saam tv
येथे क्लिक करा