Sakshi Sunil Jadhav
भारत हा कृषिप्रधान देश आहे. भारतात मोठ्या प्रमाणात शेती केली जाते.
पिढ्यांपिढ्या भारतात शेती हा व्यवसाय केला जात आहे. शेतीमध्ये तांदूळ, डाळ, गहू, ऊस अशी नाना प्रकारची शेती भारतात केली जाते.
त्यातील सगळेच धान्य शरीरासाठी महत्वाचे मानले जाते. मात्र डाळींमध्ये जे प्रोटीन असते.
डाळींची मागणी ही मोठ्या प्रमाणात केली जाते. २८ राज्यांमधील मध्यप्रदेश हे राज्य डाळ उत्पादकांसाठी प्रमुख मानले जाते.
मध्य प्रदेशात जवळजवळ ५२२५ हेक्टर क्षेत्रात डाळींची शेती केली जाते.
मध्य प्रदेशात डाळींमध्ये चणा डाळ, मुग डाळ आणि मसूर डाळ अशा प्रमुख डाळींचे उत्पादन केले आहे.
मध्य प्रदेशामध्ये डाळींची शेती रबी आणि खरीब अशा दोन्ही हंगामात केली जाते.