Surabhi Jayashree Jagdish
हिमाचल प्रदेशातील मलाना गाव भारतातील सर्वात रहस्यमयी गावांपैकी एक मानलं जातं. याठिकाणी स्थानिक लोक स्वतःला प्राचीन ग्रीक सम्राट सिकंदर महानाच्या वंशजांचं मानतात. या गावाची वेगळी जीवनशैली, परंपरा आणि सामाजिक नियम पर्यटकांचे लक्ष वेधून घेतात.
मलाना गावातील लोक त्यांच्या प्राचीन परंपरा आणि स्वतंत्र सामाजिक व्यवस्थेसाठी ओळखली जातात. गावातील अनेक नियम बाहेरील लोकांपेक्षा वेगळे आहेत आणि त्यांचे पालन स्थानिक लोक करतात.
आसामच्या दिमा हासाओ जिल्ह्यातील जटिंगा गाव पक्ष्यांच्या अनोख्या घटनेमुळे प्रसिद्ध आहे. याठिकाणी काही विशिष्ट काळात स्थलांतरित पक्षी रात्रीच्या वेळी दिशाभूल होऊन खाली पडल्याच्या घटना नोंदवल्या गेल्या आहेत. या घटनेमागे वैज्ञानिक कारणं असल्याचं अभ्यासकांनी सांगितलंय.
उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यातील रूपकुंड झीलला ‘कंकाल झील’ असंही म्हटलं जातं. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मानवी सांगाडे आढळल्यामुळे हे ठिकाण चर्चेत आलंय. संशोधनानुसार, हे सांगाडे शेकडो वर्षांपूर्वी झालेल्या नैसर्गिक आपत्तीत मृत्यू झालेल्या लोकांचं असल्याचं मानलं जातं.
राजस्थानच्या अलवर जिल्ह्यातील भानगड किल्ला भारतातील सर्वात प्रसिद्ध रहस्यमय ठिकाणांपैकी एक आहे. सूर्यास्तानंतर याठिकाणी नकारात्मक शक्तींचा वावर असल्याच्या अनेक कथा सांगितल्या जातात.
महाराष्ट्रातील अजिंठा आणि वेरूळ लेणी त्यांच्या प्राचीन स्थापत्यकलेसाठी जगभर प्रसिद्ध आहेत. या लेणी हजारो वर्षांपूर्वी कठीण दगडांमध्ये कोरून तयार करण्यात आल्या आहेत. एवढ्या जुन्या काळात इतक्या उत्कृष्ट कलाकृती कशा निर्माण केल्या गेल्या, हे अनेकांसाठी आश्चर्याचा विषय आहे.
केरळमधील तिरुवनंतपुरम याठिकाणी असलेलं पद्मनाभस्वामी मंदिर भारतातील प्रसिद्ध रहस्यमय धार्मिक स्थळांपैकी एक आहे. मंदिराच्या भूमिगत कक्षांमध्ये सापडलेल्या मोठ्या संपत्तीमुळे हे मंदिर जगभर चर्चेत आलंय.