ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
९ ऑगस्ट २०२५ रोजी देशभरात रक्षाबंधन सण साजरा केला जाईल.
या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधतात आणि त्यांच्या दिर्घआयुष्याची प्रार्थना करतात.
राखी बांधताना योग्य दिशेची काळजी घेणे गरजेचे आहे,यामुळे नातं मजबूत होते.
राखी बांधताना बहिणीचे तोंड पूर्व किंवा ईशान्य दिशेला असावे, याला शुभ मानले जाते.
राखी बांधताना भावाने पश्चिम किंवा दक्षिण दिशेला तोंड करुन बसणे शुभ मानले जाते.
जर घरातील मंदिर पूर्व दिशेला असेल तर या दिशेला राखी बांधा.
या दिशांना सकारात्मक उर्जेचे प्रतीक मानले जाते. म्हणून राखा बांधताना योग्य दिशेला बसणे गरजेचे आहे.