ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
उन्हाळ्याच्या दिवसात पाणी कमी प्यायल्याने आपल्याला अनेक आरोग्यासंबंधित समस्या जाणवतात.
उन्हाळ्यात शरीर निरोगी ठेवण्यासाठी योग्य भांड्यातील पाणी पिणे आवश्यक असते असे म्हणले जाते.
मात्र तुम्हाला माहिती आहे का?उन्हाळ्यात कोणत्या भांड्यातून पाणी पिणे योग्य आहे.
कायम पाणी पिण्यासाठी काचेचा ग्लास योग्य समजला जातो.
काचेच्या ग्लासमधून पाणी प्यायल्याने पाण्याच्या गुणवत्तेवर कोणताही परिणाम होत नाही.
तांब्याच्या भांड्यात अधिक काळ पाणी ठेवलेले पाणी प्यायल्याने ते शरीरासाठी योग्य नसते.
म्हणून काचेच्या क्लासमधून पाणी पिणे शरीरासाठी चांगले समजले जाते.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.