Manasvi Choudhary
अवघ्या काही दिवसात म्हणजेच १८ ऑक्टोबर २०२५ पासून दिवाळी सणाला सुरूवात होणार आहे. दिवाळी हा सण प्रकाशाचा, मांगल्याचा आणि विजयाचा सण आहे. या दिवाळी जीवनातील अंधार दूर होऊन प्रकाश येतो.
दिवाळीला नवीन वस्त्र घालण्याची जुनी परंपरा आहे म्हणून दिवाळी या सणाला सर्वजण नवीन कपडे घेतात.
दिवाळी सणाच्या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करून नवीन वस्त्र परिधान केले जाते. माता लक्ष्मीची पूजा केली जाते.
दिवाळी हा वाईटावर चांगल्याच्या विजयाचा उत्सव आहे. या दिवशी नवीन कपडे घालणे म्हणजे नकारात्मकता दूर होते.
दिवाळी सणाला नवीन कपडे खरेदी केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते, घरामध्ये सुख- शांती येते. दिवाळीत नवीन कपडे खरेदी केल्याने शुक्र ग्रह मजबूत होतो असे मानले जाते.
दिवाळीच्या दिवशी काळा रंगाचे वस्त्र कोणीही परिधान करू नये. काळा रंग नकारात्मकता पसरवतो असे मानले जाते.
लक्ष्मी पूजनाच्या वेळी मुख्यत: काळा रंगाचे वस्त्र परिधान करू नये यामुळे लक्ष्मी देवी नाराज होईल.
ज्योतिषशास्त्रानुसार, काळा रंग शनीचा प्रभाव आकर्षित करू शकतो यामुळे तो रंगाचे वस्त्र घालणे टाळा.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.