ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
रणजी ट्रॉफी देशांतर्गत खेळली जाणारी प्रथम श्रेणीची क्रिकेट स्पर्धा आहे.
भारताच्या पहिल्या कसोटी क्रिकेटपटूंपैकी एक रणजितसिंहजी यांच्या नावावरून या स्पर्धेला नाव देण्यात आलं.
रणजी ट्रॉफीमध्ये सर्वाधिक विजेतेपदांचा विक्रम मुंबईच्या नावावर आहे.
2019 पर्यंत मुंबईच्या संघाकडे रणजीचे 41 विजेतेपद आहेत.
रणजी ट्रॉफी स्पर्धेची पहिली स्पर्धा 1934-1935 मध्ये आयोजित करण्यात आली होती.
वसीम जाफर याने रणजी ट्रॉफी स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक धावा केल्यात.
रणजी ट्रॉफी स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम राजिंदर गोयल याच्या नावावर आहे.
येथे क्लिक करा