Surabhi Jayashree Jagdish
लोक अनेकदा औषधे कचऱ्यात फेकतात. एका अभ्यासानुसार, ६०% पेक्षा जास्त लोकांना कचरा विल्हेवाटीच्या नियमांची माहिती नाही.
एक्सपायर औषधांची विल्हेवाट लावणं ही एक गंभीर समस्या आहे. अनेक देशांमध्ये अशी औषधं कचराकुंडीत किंवा गटारात टाकणं बेकायदेशीर आहे.
औषधे कचऱ्याच्या डब्यात टाकल्याने रसायने मातीत मिसळू शकतात. यामुळे भूगर्भातील पाणी दूषित होण्याचा धोका वाढतो, ज्यामुळे पिण्याचे पाणी दूषित होते.
काही औषधांमुळे मासे आणि मानवांमध्ये हार्मोनल असंतुलन निर्माण होत असल्याचं दिसून आले आहे.
काही देशांमध्ये, फार्मसी एक्सपायर झालेली औषधे मोफत घेतात. भारतातील काही खाजगी औषध दुकानं ही सुविधा देतात.
जर सुविधा उपलब्ध नसेल, तर कचरा टाकण्यापूर्वी औषधे सीलबंद पिशवीत ठेवा जेणेकरून मुले आणि प्राणी औषधे पोहोचू शकणार नाहीत.