Dhanshri Shintre
सूर्य उगम आणि मावळतीचे दृश्य पाहताना मन शांत होते आणि निसर्गाशी एक वेगळंच नातं निर्माण होतं.
भारतामध्ये सूर्योदय आणि सूर्यास्त अनुभवण्यासाठी अनेक निसर्गरम्य आणि प्रसिद्ध ठिकाणं आहेत, जी पर्यटकांना आकर्षित करतात.
भारतामध्ये एक अनोखं गाव आहे, जिथे सूर्यास्त इतरांपेक्षा लवकर, म्हणजेच दुपारी चार वाजताच होतो.
भारतातील पहिला सूर्योदय अरुणाचल प्रदेशात दिसतो, कारण हे राज्य देशाच्या अत्यंत पूर्वेकडील भागात स्थित आहे.
अनेकांना हे ठाऊक असेल की भारतात सूर्योदय सर्वप्रथम अरुणाचल प्रदेशात होतो आणि तिथूनच दिवसाची सुरुवात होते.
पण भारतात सर्वात आधी सूर्यास्त कुठे होतो, हे तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या या खास ठिकाणाबद्दल.
अरुणाचल प्रदेशातील अंजाव जिल्ह्यातील डोंग गावात भारतात सर्वात लवकर सूर्यास्त होतो, हे विशेष लक्षवेधी ठिकाण आहे.