ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
काही लोकांना सकाळी अंघोळ करायला आवडते तर काहींना संध्याकाळी अंघोळ करायला आवडते. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की, अंघोळ करण्याची योग्य वेळ कोणती? जाणून घ्या.
सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळी अंघोळ करणे फायदेशीर आहे.
सकाळी अंघोळ केल्याने तुम्ही दिवसभर ताजेतवाने राहता. यामुळे मन आणि शरीर दोन्ही शांत होते.
सकाळी अंघोळ केल्याने तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होऊ शकते.
संध्याकाळी अंघोळ केल्याने तुमचा संपूर्ण दिवसाचा थकवा कमी होतो आणि तणाव कमी होण्यास मदत होते, ज्यामुळे चांगली झोप येण्यास मदत होते.
संध्याकाळी अंघोळ केल्याने दिवसभरातील सर्व धूळ, घाण, आणि घाम निघून जाते.
जर तुम्हाला दिवसभर ताजेतवाने राहायचे असेल तर सकाळी अंघोळ करा.जर तुम्हाला रात्री चांगली झोप घ्यायची असेल, तर संध्याकाळी अंघोळ करणे हा तुमच्यासाठी एक चांगला पर्याय आहे.