Aurangzeb last words : मृत्यूपूर्वी औरंगजेबाचे अखेरचे शब्द काय होते?

Surabhi Jayashree Jagdish

कठोर निर्णय

औरंगजेबाने भारतावर ४९ वर्षे राज्य केलं. त्यांनी आयुष्यभर आपली सत्ता टिकवण्यासाठी कठोर निर्णय घेतले.

शेवटचा काळ

सत्तेसाठी आपल्या भावांचा पराभव करणाऱ्या औरंगजेबाने विस्तीर्ण साम्राज्य उभारलं. पण त्याच्या शेवटच्या काळात तो मानसिकदृष्ट्या अत्यंत दुर्बल झाला होता.

पश्चाताप

मरण्यापूर्वी औरंगजेबाला त्याच्या आयुष्यातील निर्णयांचा पश्चाताप झाला. आपण काहीही केलं तरी आपल्या प्रियजनांच्या बाबतीतही तेच होणार हे त्याच्या लक्षात आले.

अपयश

त्याच्या शेवटच्या क्षणी औरंगजेबाने आपल्या मुलांना - कमबख्श आणि आझम शाह - यांना बोलावले आणि आपल्या अपयशाबद्दल सांगितलं.

काय म्हणाला?

औरंगजेब म्हणाला की, अल्लाह सर्वत्र आहे, परंतु तो स्वतःला इतका पापी समजतो की त्याला त्याची उपस्थिती जाणवत नाही.

भीती

आपल्या मुलांशी बोलत असताना औरंगजेबाला भीती वाटत होती की, आपल्या कारकिर्दीत आपल्या कुटुंबाला इतरांप्रमाणेच वाईट वागणूक मिळेल.

जीवन निरर्थक

मुघल साम्राज्याला सर्वोच्च शिखरावर नेणाऱ्या औरंगजेबाने आपलं जीवन निरर्थक मानलं होतं.

इतिहासात धडा

तो म्हणाला, 'मी राजा म्हणून अयशस्वी झालो.' औरंगजेबाचे शेवटचे शब्द इतिहासात धडा म्हणून नोंदवले गेले. त्याने स्वत: कबूल केले की त्याने केलेल्या प्रत्येक गोष्टीचा आता त्याला पश्चाताप होत आहे.

Blood sugar level by Age : वयानुसार तुमची ब्लड शुगर लेवल किती असली पाहिजे?

Blood sugar level by Age | saam tv
येथे क्लिक करा