Surabhi Jayashree Jagdish
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात आजच्या आधुनिक औषधांप्रमाणे औषध फॉर्म्युले नव्हते. पण परंपरागत आयुर्वेदिक उपचार आणि वनस्पती आधारित औषधं दररोजच्या समस्या दूर करण्यासाठी वापरली जात.
त्या काळात आयुर्वेदाचे सिद्धांत आणि वनस्पती-आधारित उपचार केले जायचे. हे सगळं भारतीय पारंपरिक आयुर्वेदवर आधारित होतं जे युद्ध, पचन, जखम आणि रोग प्रतिबंधासाठी वापरण्यात येतं होतं.
शिवकालात पण आयुर्वेद हे तब्येतीसाठी मुख्य आधार होतं. यात विविध वनस्पती आणि पारंपरिक उपायांचा उपयोग केला जायचा.
लोक शेवगा, हळद यांसारख्या वनस्पती खाण्यातही समाविष्ट करायचे. या वनस्पती पचन सुधारण्यासाठी आणि रोगप्रतिकारक शक्तीसाठी उपयोगी असायच्या. या आयुर्वेदिक पद्धती आजही पारंपरिकपणे वापरल्या जातात.
गुग्गुल, आंबे हळद यांसारख्या घटकांचा वापर केला जायचा. हे जखम, सूज आणि संसर्ग दूर करण्यासाठी उपयोगी मानलं जातं होतं. पारंपरिक औषध फॉर्म्युले म्हणून काढे/चूर्ण यांचा वापर केला जायचा.
शिवाजी महाराजांच्या काळात राजवैद्य (राजाचा वैद्य) अस्तित्वात होता. तो नाडी परीक्षा आणि विषाचे निदान करण्यात पारंगत मानला जायचा. तो औषध संयोजनांचा उपयोग करून उपचार करायचा.
A glimpse of Ayurveda from the Maratha Empire period या इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या लेखात याबाबत माहिती देण्यात आलीये.