Surabhi Jayashree Jagdish
छत्रपती शिवाजी महाराजांनी एक सक्षम त्याचप्रमाणे एक न्यायपूर्ण करप्रणाली विकसित केली होती.
शिवाजी महाराजांनी 'चौथ' आणि 'सरदेशमुखी' हे दोन कर वसूल केल्याची माहिती आहे.
शेतकऱ्यांकडून थेट महसूल गोळा करण्यासाठी महाराजांनी 'रयतवारी' पद्धत लागू केली होती. ज्यामुळे मध्यस्थांचे प्रमाण कमी झाल्याचं म्हटलं गेलं.
हा कर मुघल शासनाकडून वसूल केला जाणारा एक निश्चित हिस्सा होता. जो एकूण महसुलाच्या एक चतुर्थांश (1/4) होता.
याशिवाय सरदेशमुखी नावाचा आणखी एक कर लागू करण्यात आला होता. हा कर एकूण महसुलाच्या एक दशांश (1/10) होता.
शिवाजी महाराजांनी करप्रणाली न्यायपूर्ण ठेवली, ज्यामुळे त्यांच्या राज्यव्यवस्थेमध्ये स्थिरता आणि समृद्धी आली
याव्यतिरिक्त शिवाजी महाराजांनी इतर काही कर देखील आकारले ज्यामध्ये सिंहासनपट्टी आणि अप्रत्यक्ष कर यांचा समावेश होता.