Surabhi Jayashree Jagdish
देशातील सात आश्चर्यांपैकी एक वास्तू आपल्या देशात आहे. ही वास्तू म्हणजे ताजमहाल.
मात्र तुम्हाला माहितीये का की ताजमहाल ज्या जमिनीवर आहे, त्या जमिनीवर ताजमहालपूर्वी काय होतं?
ताजमहालच्या या जमिनीबाबत युक्तिवाद केले गेले आहेत. इतिहासकारांचे म्हणणं आहे की हा एक रिकामा भूखंड होता.
असं म्हटलं जातं की हा भूखंड यमुना नदीच्या काठावर असल्याने धोरणात्मक आणि सौंदर्यात्मकदृष्ट्या योग्य होता.
काही इतिहासकारांच्या म्हणण्याप्रमाणे, पूर्वी या ठिकाणी काही लहान इमारती किंवा बागा असाव्यात. परंतु त्याबद्दल कोणतेही ठोस पुरावे नाहीत.
ताजमहालचे बांधकाम १६३२ मध्ये सुरू झाले आणि १६५३ मध्ये पूर्ण झालं होतं.
असं मानलं जातं, ताजमहल बांधण्यासाठी याच जागेची खास निवड करण्यात आली होती.