Manasvi Choudhary
उद्या रविवार १५ फेब्रुवारी २०२६ महाशिवरात्री सर्वत्र साजरी होणार आहे. महाशिवरात्रीला भगवान शंकराची पूजा केली जाते.
महाशिवरात्रिनिमित्त महिला व पुरूष उपवासाचे व्रत करतात.
महाशिवरात्रीच्या उपवासाला काय खावे आणि काय खाऊ नये या विषयी या वेबस्टोरीमध्ये जाणून घेऊया.
सफरचंद, केळी, पेरू, डाळिंब, द्राक्षे ही फळे तुम्ही खाऊ शकता.
दूध, दही, ताक, तूप आणि पनीर हे पदार्थ तुम्ही महाशिवरात्रीच्या उपवासाला खाऊ शकता.
बटाटा, रताळे, सुरण आणि रताळ्याचा कीस हे पदार्थ उपवासाला खाऊ शकता तसेच खिचडी, वडे किंवा साबुदाणा खीर हे पदार्थ खाल्ल्याने शरीराला उर्जा मिळते.
तांदूळ, बाजरी, ज्वारी आणि कोणत्याही प्रकारच्या डाळी किंवा कडधान्ये उपवासाला खाऊ नये
कांदा आणि लसूण हे पदार्थ 'तामसिक' मानले जातात, त्यामुळे उपवासाच्या अन्नात यांचा वापर करू नये.
हळद, मोहरी, गरम मसाला किंवा धने पूड उपवासाला वापरत नाहीत. तिखटासाठी हिरवी मिरची किंवा काळी मिरी वापरावी.