Sakshi Sunil Jadhav
उन्हाळा आणि पावसाळ्यात डास येण्याची संख्या वाढत असते. त्यामुळे डेंग्यु , मलेरिया, चिकनगुनियासारखे आजार होतात.
पुढे आपण डास चावल्यावर लगेच काय करावे? याबद्दल तज्ज्ञांकडून टिप्स जाणून घेणार आहेत.
डास चावल्यानंतर लगेचच ती जागा पाण्याने पूर्णपणे स्वच्छ केली पाहिजे.
डास चावल्याने शरीराला खाज सुटते किंवा लगेचच सुज येते. त्यावेळेस लगेचच बर्फाने ती जागा शेकवा.
डास चावल्यानंतर त्वचेवर अॅंटी हिस्टामाइन क्रीम लावा. त्याने खाज सुटणार नाही.
डास चावल्यानंतर कोरफडीचा वापर करा. त्याने जळजळ कमी होईल.
डासांच्या चावण्यावर नैसर्गिक उपाय म्हणजे कडुलिंबाचे तेल. हे त्वचेला त्वरित आराम मिळवून देते.