Surabhi Jayashree Jagdish
पावसाळ्यात हवेत ओलावा जास्त असल्यामुळे अन्न लवकर खराब होण्याची शक्यता वाढते. या काळात बॅक्टेरिया आणि बुरशी वाढण्याचा वेगही जास्त असतो. म्हणून फ्रिजचे टेम्प्रेचर योग्य ठेवणे अत्यंत आवश्यक असते.
पावसाळ्यातील जास्त आर्द्रतेमुळे फळे, भाजीपाला आणि इतर पदार्थ लवकर सडू शकतात. फ्रिज योग्य थंड नसल्यास हे पदार्थ सुरक्षित राहत नाहीत. यामुळे अन्न वाया जाण्याचे प्रमाण वाढते.
फ्रिजचं तापमान योग्य नसल्यास कूलिंग योग्य प्रकारे होत नाही. यामुळे अन्नाची ताजेपणा आणि गुणवत्ता कमी होते. योग्य तापमान नियंत्रण केल्यास अन्न जास्त काळ सुरक्षित राहते.
तज्ज्ञांच्या मते पावसाळ्यात फ्रिजचं तापमान 2 ते 4 डिग्री सेल्सियस असावं. हे तापमान अन्न खराब होण्याचा वेग कमी करण्यास मदत करते. या रेंजमध्ये फ्रिज सर्वात कार्यक्षम पद्धतीने काम करतो.
या तापमानामुळे बॅक्टेरियाची वाढ कमी होते आणि अन्न सुरक्षित राहते. दूध, भाजीपाला आणि शिजवलेले अन्न जास्त वेळ ताजे राहते. यामुळे फूड वेस्टेज कमी होण्यास मदत होते.
जर बाहेरचं वातावरण फार थंड नसेल तर फ्रिज 3 डिग्री सेल्सियसवर ठेवणं योग्य ठरतं. या सेटिंगमुळे अन्न सुरक्षित राहते आणि फ्रिजवर ताणही कमी येतो.
जर बाहेर तापमान जास्त असेल तर फ्रिज 4 डिग्री सेल्सियसवर ठेवणं योग्य असतं. यामुळे आतले अन्न अधिक थंड आणि सुरक्षित राहतं. उष्णतेच्या काळात हे सेटिंग अन्न लवकर खराब होण्यापासून वाचवते.