Sakshi Sunil Jadhav
रक्तातली साखर (High Blood Sugar) जेव्हा वाढते. तेव्हा रक्ताभिसरण कमी होतं आणि नसा कमजोर होतात. यामुळे पायांवर जखमा, संसर्ग आणि वेदना होण्याचा धोका वाढतो. अशावेळी रोजची पायांची योग्य काळजी घेणं महत्वाचं असतं.
कोमट पाण्याने आणि साबणाने पाय स्वच्छ धुवा. बोटांमधील जागा नीट कोरडी ठेवा, नाहीतर बुरशी आणि संसर्ग होऊ शकतो.
पायावर सूज, लालसरपणा, फोड, भेगा किंवा नवीन जखम दिसत असेल तर दुर्लक्ष करू नका. लहान जखमाही मोठा त्रास देतात.
टाच किंवा तळव्याला मॉइश्चरायझर लावा, पण बोटांमध्ये क्रीम लावू नका. तिथे ओलावा राहिल्याने बुरशी वाढू शकते.
नखे सरळ कापा आणि खूप खोल कापू नका. डोळ्यांची कमजोरी किंवा नसांचे त्रास असल्यास तज्ज्ञांची मदत घ्या.
मऊ, कुशन असलेले आणि पायाला योग्य मापाचे बूट वापरा. घट्ट किंवा कडक चप्पल-बूट टाळा.
दररोज स्वच्छ, मऊ मोजे घाला. यामुळे घर्षण कमी होतं आणि पाय सुरक्षित राहतात.
पाय दुखणं, सुन्नपणा जाणवणं, रंग बदल किंवा जखम बरी न होणे ही धोक्याची लक्षणे असू शकतात.
पायांशी संबंधित कोणताही त्रास जाणवल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. लवकर उपचार केल्यास मोठ्या गुंतागुंती टाळता येतात.