Dhanshri Shintre
विवाह हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक अविस्मरणीय आणि अत्यंत आनंदाचा क्षण मानला जातो.
हिंदू परंपरेनुसार विवाह समारंभात अनेक पारंपरिक विधी आणि संस्कार पार पाडले जातात.
हिंदू विवाहपरंपरेत साखरपुड्याने लग्नाच्या विविध विधींची सुरुवात होते आणि विवाह प्रक्रियेला गती मिळते.
या समारंभात वधू आणि वर एकमेकांच्या बोटात अंगठी घालून आपले नाते अधिकृत करतात.
डाव्या हाताच्या अनामिकेच्या बोटात अंगठी घालण्याची परंपरा प्रेम आणि निष्ठेचे प्रतीक मानली जाते.
वैदिक ज्योतिषानुसार अनामिका बोट प्रेम, ऊर्जा आणि तेज यांचे प्रतीक मानले जाते, त्यामुळे याला खास महत्त्व आहे.
वैवाहिक नाते कायम टिकावे म्हणून डाव्या हाताच्या अनामिकेवर अंगठी परिधान करण्याची परंपरा पाळली जाते.
डाव्या हाताची चौथी बोट हृदयाशी जोडलेली मानली जाते, त्यामुळे त्या बोटात अंगठी घालण्याची प्रथा आहे.