ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
फळं खाण्याचे अनेक फायदे आहेत. प्रत्येक फळ वेगवेगळ्या पोषक तत्वांनी समृद्ध असते. परंतु फळे खाण्याची योग्य वेळ कोणती माहितीये का, जाणून घ्या.
जर फळं योग्य वेळी खाल्ली तर त्यातील पोषक तत्वाचा शरीराला योग्य प्रकारे फायदे होतो.
पण फळे खाण्याची योग्य वेळ कोणती आहे हे फार कमी लोकांना माहिती आहे. फळे खाण्याची योग्य वेळ कोणती जाणून घेऊयात.
फळे खाण्याची सर्वोत्तम वेळ म्हणजे सकाळ. तसेच दुपारी 12 वाजण्यापूर्वी नाश्त्यात फळं खाणे सर्वात फायदेशीर मानले जाते.
कारण यावेळी आतड्यांमध्ये अन्न पचवण्याची क्षमता अधिक असते. यावेळी शरीराला फळांमधून सर्व व्हिटॅमिन्सआणि मिनरल्स मिळतात.
तुम्ही दुपारी जेवणानंतर तसेच संध्याकाळी ४ ते ५ दरम्यान देखील फळे खाऊ शकता.
तज्ज्ञांच्या मते, आहारात ताजी फळे खाल्ली पाहिजेत. जेणेकरुन आरोग्याला अनेक फायदे होतात.