Shreya Maskar
लग्नाचे महत्त्व दोन व्यक्तींना सामाजिक, कायदेशीर आणि भावनिक बंधनात जोडून स्थिर, आनंदी आणि वैयक्तिक विकासासाठी आधार देणारे आहे. आजकाल लग्नासंबंधित प्रत्येकाच्या वेगवेगळ्या कल्पना, मते आहेत, ज्यांचा आदर केला पाहिजे.
भारतात लग्नासाठी कायदेशीर वय मुलींसाठी १८ वर्षे आणि मुलांसाठी २१ वर्षे पूर्ण असे आहे. मात्र मानसिक प्रगल्भता आणि आर्थिक स्थैर्यासाठी अनेकदा २५ ते ३० वर्षे हे वय अधिक योग्य मानले जाते.
लग्नासाठी मुला-मुलीच्या वयात साधारण ३ ते ५ वर्षांचे अंतर योग्य मानले जाते. या फरकामुळे परिपक्वता आणि सुसंवाद चांगला राहतो. तसेच वैवाहिक जीवन सुखकर राहते.
लग्नामध्ये मुलगा वयाने मोठा असावा, ही एक पारंपरिक समजूत आहे, जी प्रामुख्याने परिपक्वता, आर्थिक स्थिरता आणि शारीरिक/भावनिक सुरक्षेच्या कल्पनेवर आधारित आहे. मोठा मुलगा अधिक समजूतदारपणे संसार सांभाळू शकतो आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या उत्तम प्रकारे पेलू शकतो, असे बोले जाते. तसेच आजकाल मुलापेक्षा मुलगी वयाने मोठी असेल तरी हे सामान्य मानले जाते.
मानसोपचार तज्ज्ञांच्या मते, नात्यामध्ये वयाच्या फरकापेक्षा मानसिक परिपक्वता, भावनिक समज आणि जीवनातील ध्येये अधिक महत्त्वाची असतात. आजकाल लग्नासाठी वय पाहणे तितके गरजेचे वाटत नाही.
वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिले तर, पती-पत्नीच्या वयातील फरक १० वर्षाहून अधिक असेल तर काही आव्हाने निर्माण होऊ शकतात. उदा. जीवनशैली आणि भविष्यातील प्राधान्यक्रम
तुम्हाला तुमचे नाते वयाच्या पलीकडे यशस्वी करायचे असेल, तर भावनिक परिपक्वता, परस्पर आदर, मोकळा संवाद, ध्येयांची जुळवणूक, वैयक्तिक जागेचा आदर, मैत्री, प्रेम या सर्व महत्त्वाच्या गोष्टी आहेत.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.