Saam Tv
विरांगणा झाशीची राणी एकोणिसाव्या शतकातील झाशी या राज्याच्या राणी होत्या.
१९ नोव्हेंबर १८२८ रोजी वाराणसी काशी या ठिकाणी झाशीच्या राणी जन्माला आल्या.
झाशीच्या राणीचे वडील म्हणजे मोरोपंत तांबे. हे पुण्याचे ब्राम्हण आणि न्यायालयीन कर्मचारी होते.
झाशीच्या राणीचे माहेरकडचे नाव 'मणिकर्णिका मोरोपंत तांबे' होते. त्यांचे टोपन नाव 'मनू' होते.
मणिकर्णिका यांचा विवाह झाशीचे राजे गंगाधरराव नवाळकर यांच्याशी झाला.
विवाहानंतर प्रथेप्रमाणे त्यांचे नाव 'लक्ष्मीबाई' ठेवले गेले.
पुढे त्यांनी 1857-58 च्या वेळेस भारतीय विद्रोहाच्या वेळी जलदगतीने सैन्य घेऊन बुंदेलखंड प्रदेशातील बंडखोरांची जबाबदारी स्विकारली.
त्यांनी स्त्रियांच्या सैन्यदलाचे नेतृत्व केले आणि रणभूमीवर पुरुषांसारखी लढली. म्हणूनच इतिहासात त्यांना "झाशीची राणी लक्ष्मीबाई" म्हणून ओळखले जाते.