Manasvi Choudhary
लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्वाचा टप्पा असतो.
लग्नानंतर मुला- मुलींच्या आयुष्यात अनेक नवीन बदल होतात यासाठी लग्न योग्य वयात होणे महत्वाचे आहे.
लग्न वयात करा.. असे तुम्ही अनेक वडिलधाऱ्या मंडळीकडून ऐकलं असेल. परंतू यामागचं नेमकं कारण काय? समजून घ्या.
बदलत्या काळानुसार लग्नाचे नेमके वय निश्चित करणे आव्हान बनले आहे.
लग्न करण्यासाठी २२ ते २५ वय योग्य मानले जाते. कायदेशीर प्रक्रियेनुसार, मुलींसाठी लग्न करण्याचे किमान वय १८ वर्षे आणि मुलांसाठी २१ वर्षे पूर्ण असणे बंधनकारक आहे.
शारीरिक, मानसिक आणि सामाजिक दृष्टिकोनातून वय निश्चित करणे आवश्यक आहे.