Manasvi Choudhary
लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्वाचा टप्पा असतो. लग्नानंतर मुला- मुलींच्या आयुष्यात अनेक नवीन बदल होतात
लग्न करण्यासाठी मुलगा आणि मुलीचे वय योग्य असणे महत्वाचे आहे. मुलीचे वय हे १८ वर्षांपेक्षा कमी किंवा मुलाचे वय हे २१ वर्षांपेक्षा कमी असेल, तर ते बालविवाह मानले जाते.
योग्य वयात लग्न करण्याची कारणे नेमकी काय आहेत. ते या वेबस्टोरीतून थोडक्यात समजून घेऊया.
लग्न हे वयानुसारच नाही तर शारीरिक व मानसिकदृष्ट्या मुलगा व मुलगी तयार आहेत का हे देखील पाहून केले जाते.
लग्न करण्यासाठी २२ ते २५ वय योग्य मानले जाते. कायदेशीर प्रक्रियेनुसार, मुलींसाठी लग्न करण्याचे किमान वय १८ वर्षे आणि मुलांसाठी २१ वर्षे पूर्ण असणे बंधनकारक आहे.
शारीरिक, मानसिक आणि सामाजिक दृष्टिकोनातून वय निश्चित करणे आवश्यक आहे.