Dhanshri Shintre
भारतीय लग्नांमध्ये नवरदेवाचे बूट चोरणे ही एक प्राचीन परंपरा आहे. ही परंपरा मुख्यतः उत्तर भारतातील हिंदू लग्नांमध्ये पाहायला मिळते.
वधूच्या बहिणी किंवा मैत्रिणी बूट चोरून नवरदेवाला हलक्या फुलक्या रितीने चिडवतात.
बूट चोरण्याचा उद्देश केवळ मजा आणि आनंद निर्माण करणे आहे. नवरदेव आणि वधूच्या कुटुंबीयांमध्ये या निमित्ताने एक आनंददायी संवाद होतो.
बूट परत करण्यासाठी वधूच्या बहिणी नवरदेवाकडून बक्षीस मागतात. नवरदेव कधी कधी पैसे, चॉकलेट, किंवा इतर भेटवस्तू देऊन बूट परत मिळवतो.
नवरदेवाचे मित्र आणि भावंडे बूट वाचवण्यासाठी योजना आखतात, ज्यामुळे मजा दुपटीने वाढते.
यासोबतच नवरदेव किती हुशारीने त्याच्या मेहुण्यांकडून आपले बूट परत घेऊ शकतो हेही पाहायला मिळतं. ज्यामुळे त्याचा व्यवहारिकपणाही समोर येतो.
बूट लपवण्याच्या विधीमागे आणखी एक तर्क आहे. असे म्हणतात की निरोपाच्या वेळी बहुतेक लोक रडायला लागतात, मग बूट लपवण्याच्या विधीमुळे तेथे मनोरंजनाचा आणि हास्याचा भर दिला जातो.
NEXT: मंगळसूत्रामध्ये दोन वाट्या का असतात? जाणून घ्या महत्त्व