Manasvi Choudhary
नंदुरबार हा महाराष्ट्र राज्यातील एक मुख्य जिल्हा आहे.
१ जुलै १९९८ रोजी धुळे जिल्ह्यातून वेगळा नंदुरबार जिल्ह्याची निर्मिती झाली.
नंदुरबार जिल्ह्याला महाराष्ट्र, गुजरात व मध्यप्रदेश राज्याची सीमा आहे.
नंदुरबार हा अदिवासी संस्कृतीचा जिल्हा आहे.
नंदुरबार येथे पूर्वी नंद्राज राजाचे राज्य होते, त्यामुळे हे शहर एकेकाळी नंद्रनगरी म्हणून ओळखले जात होते.
प्राचीन काळी येथे नंदीश्वर नावाचा एक संत राहत असे आणि त्यांनी या ठिकाणी तपस्या केली होती.
या संतांचा प्रभाव असल्याने या भागाला "नंदीश्वर बार" असे नाव पडले आणि पुढे ते "नंदुरबार" म्हणून ओळखले जाऊ लागले.