Manasvi Choudhary
सकाळी रिकाम्या पोटी तुळशीचे पाणी पिणे हे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर
तुळशीमध्ये असलेल्या पोषक घटकांमुळे शरीरातील 'मेटाबॉलिजम' फास्ट होते यामुळे शरीराची चरबी वितळते आणि वजन कमी होते.
तुळशीची पाने शरीरातील चयापचय क्रिया वेगवान करतात. यामुळे आपण दिवसभरात जे काही खातो, त्याचे ऊर्जेत रूपांतर लवकर होते आणि चरबी साठत नाही.
तुळशीचे पाणी शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत करते. शरीर स्वच्छ असेल तर वजन कमी होण्याची प्रक्रिया सोपी होते.
तुळशीमुळे पचनक्रिया सुधारते. तुळशीचे पाणी प्यायल्याने अपचन आणि गॅसचा त्रास कमी होतो.
रोज तुळशीचे पाणी प्यायल्याने सर्दी-खोकल्यासारखे आजार दूर राहतात. रक्ताभिसरण सुधारल्यामुळे चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो येतो.