Manasvi Choudhary
लग्नानंतर नवरा-बायकोचं नातं हे दोन व्यक्तींमधील नातं नसून दोन जीवांचे एक सुंदर नातं सुरू होतं.
लग्नानंतर नवऱ्या- बायकोने नात्यात काही सवयी पाळल्या तर नाते आणखी घट्ट होते.
लग्नानंतर तुम्ही पती-पत्नी असण्याआधी एकमेकांचे उत्तम मित्र असायला हवेत. जिथे मैत्री असते, तिथे मोकळेपणा असतो.
प्रेमापेक्षाही 'आदर' जास्त महत्त्वाचा असतो. एकमेकांच्या आवडीनिवडी, करिअर, स्वभाव आणि विचारांचा आदर करा.
मनात काही धरून ठेवण्यापेक्षा शांतपणे बोलून दाखवा. किती मोठा वाद असला तरी तो शांतपणे सोडवण्याचा प्रयत्न करा.
लग्नाचा अर्थ असा नाही की तुम्ही २४ तास एकमेकांमध्येच गुंतले पाहिजे. प्रत्येकाचं स्वतःचं एक स्वतंत्र आयुष्य, मित्र आणि छंद असतात.
नात्यात विश्वास हा अत्यंत महत्वाचा असतो . एकमेकांपासून गोष्टी न लपवणे आणि एकमेकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे यामुळे नात्यात एक सुरक्षिततेची भावना निर्माण होते.