Dhanshri Shintre
रेबीज हा विषाणूजन्य आजार आहे जो संक्रमित कुत्रा, मांजर, माकड यांच्या चाव्यामुळे होतो आणि मज्जासंस्थेवर परिणाम करत प्राणघातक ठरतो.
संक्रमित प्राण्याच्या चाव्याने, चाटण्याने किंवा ओरखड्याने लाळेतून रेबीज विषाणू शरीरात प्रवेश करतो आणि गंभीर आजार होऊ शकतो.
प्राण्याच्या चाव्याच्या जागी जळजळ, मुंग्या किंवा खाज येणे ही रेबीजची सुरुवातीची लक्षणे असू शकतात.
शरीरात ताप, अशक्तपणा व थकवा जाणवतो, जी लक्षणे सामान्य वाटली तरी रेबीजमध्ये ती लवकर आणि तीव्रपणे वाढतात.
रेबीजचे लक्षण म्हणजे घसा कोरडा होणे आणि पाणी पाहून घाबरणे, कारण घशातील स्नायू आकुंचनामुळे पाणी प्यायण्यात त्रास होतो.
रेबीजमुळे शरीरात वेगवेगळ्या भागांमध्ये वेदना सुरू होऊन अर्धांगवायू होऊ शकतो, तसेच श्वसन व हृदयावरही याचा गंभीर परिणाम होतो.
रेबीजमध्ये चिडचिड, गोंधळ, राग व मानसिक असंतुलन दिसून येते, काही वेळा व्यक्ती विचित्र वागणूक दाखवते किंवा हिंसक होऊ शकते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.