Dhanshri Shintre
कांदा आणि लसूण या दोन्ही भाज्या चविष्ट असण्यासोबतच आरोग्यासाठी लाभदायक आहेत आणि अनेकजण त्या विविध प्रकारांनी आहारात सामावतात.
आज आम्ही तुम्हाला महिनाभर कांदा आणि लसूण न खाल्ल्यास शरीरावर काय परिणाम होऊ शकतात, याबद्दल सविस्तर माहिती देणार आहोत.
कांद्यात व्हिटॅमिन C, B6, फोलेट, फायबर, अँटीऑक्सिडंट्स, क्वेर्सेटिन, सल्फर, कॅल्शियम, लोह, पोटॅशियम यांसारखे अनेक पोषक घटक कमी कॅलरीसह असतात.
लसूणमध्ये कार्बोहायड्रेट्स, प्रथिने, फायबर, व्हिटॅमिन C, B6, B9, पोटॅशियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि फॅट असून हे घटक शरीरास निरोगी ठेवतात.
महिनाभर कांदा आणि लसूण न खाल्ल्यास शरीरातील उष्णता वाढून डोकेदुखी, तोंडात अल्सर आणि अशक्तपणाच्या समस्या निर्माण होऊ शकतात.
महिनाभर कांदा आणि लसूण न खाल्ल्याने पोट फुगणे आणि अपचन होण्याची शक्यता वाढते; त्यामुळे त्यांचे सेवन चालू ठेवणे आवश्यक आहे.
आजकाल हृदयरोग वाढत आहेत, महिनाभर कांदा आणि लसूण न खाल्ल्याने रक्तदाब वाढण्याचा धोका निर्माण होऊ शकतो, त्यामुळे त्यांचा नियमित सेवन आवश्यक आहे.