ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
पाल ही जवळपास प्रत्येकाच्या घरात आढळते. बऱ्याच लोकांना पालीची भीती वाटते.
पाल विषारी असते. परंतु तुम्हाला माहितीये का, पाल चावल्याने काय होते, जाणून घ्या.
पाल चावल्याने माणसाचा मृत्यू होत नाही. परंतु इन्फेक्सन होण्याची शक्यता वाढते.
पाल चावल्याने खाज सुटणे, पुरळ येणे, सूज येणे आणि ताप येणे यासारखे आजार होऊ शकतात.
याशिवाय, पाल चावल्यावर मळमळ, उलटी येणे सारखी लक्षण दिसू लागतात.
पाल चावल्याने श्वास घेण्यास देखील त्रास होऊ शकतो.
पालीच्या काही प्रजाती विषारी आणि धोकादायक असू शकतात. पाल १० ते २० वर्षे जगतात.