Manasvi Choudhary
आजकाल अनेकलोक डाएट करतात. वजन कमी करण्यासाठी गव्हाची चपाती खाणे टाळतात.
मात्र गव्हाची चपाती खाणं बंद केल्याने शरीरात अनेक बदल झालेले दिसून येतात.
गव्हामध्ये कार्बोहायड्रेट्स आणि कॅलरीजचे प्रमाण जास्त असते. तसेच गव्हाचा 'ग्लायसेमिक इंडेक्स' जास्त असल्याने ते रक्तातील साखर वाढवते, ज्यामुळे शरीराची चरबी वाढते. चपाती खाणं बंद केले तर वजन कमी होईल.
गव्हातील 'ग्लूटेन' प्रथिनामुळे अपचन, पोट फुगणे किंवा गॅसचा त्रास होतो. गव्हाची चपाती खाणं बंद केल्याने पचनक्रिया सुधारते पोट हलके होते.
गव्हाची चपाती खाल्ल्याने शरीरात रक्तातील साखर अचानक वाढते आणि नंतर तितक्याच वेगाने कमी होते मात्र चपाती खाणं सोडल्याने रक्तातील साखर नियंत्रणात राहते.
गव्हाची चपाती खाल्ल्याने छातीत जळजळ होते ज्याचा परिणाम चेहऱ्यावर दिसून येतो चपाती खाणं सोडल्याने त्वचा चमकदार होण्यास मदत होते.
जर तुम्हाला सवय असेल, तर हळूहळू प्रमाण कमी करा. एकदम गहू सोडल्यास काही दिवस अशक्तपणा जाणवू शकतो.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.