Sakshi Sunil Jadhav
सगळ्यात आधी आषाढी एकादशी सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा.
आषाढी एकादशीला विठ्ठलाच्या पायथ्याशी माथा टेकवून अभंगाच्या तालावर सगळे वारकरी डोलत असतात.
आषाढी एकादशी पूजा, भजन यासोबत चंदनाचा टीका लावण्याची एक वेगळी परंपरा आहे.
चंदनाचा टीका लावल्याने अनेक धार्मिक, अध्यात्मिक व शारीरिक असे अनेक फायदे मिळतात.
चंदन हे श्री विष्णूचे आवडते मानले जाते.
आषाढी एकादशीला चंदनाचा टीका लावल्याने श्रीविठ्ठलाची कृपा मिळते असे मानले जाते.
कपाळाच्या मध्य भागी चंदन लावल्याने ध्यान, एकाग्रता आणि आत्मशुद्धीला चालना मिळते.
चंदनाचा सुंगध डोकं मन एकदम शांत करतो.
अपोमाथेरपीमध्ये चंदनाचा वापर डिप्रेशन, अनिद्रा आणि मानसिक थकवा कमी करण्यासाठी होतो.
आयुर्वेदानुसार चंदनाचा टीका लावल्याने त्वचेवरील जळजळ, घाम, डोके दुखी अशा समस्या दूर होतात.