Dhanshri Shintre
बर्याच वेळा घरांमध्ये अन्न जास्त शिजते आणि ते पुढील दिवशी उरलेले अन्न म्हणून वापरले जाते.
भात अनेकदा जास्त शिजवला जातो आणि लोक तो उरलेल्या अन्नाप्रमाणे वेगवेगळ्या पद्धतीने सेवन करतात.
तुम्हाला माहित आहे का, उरलेला भात खाण्याचे फायदेही आहेत आणि तोटेही होऊ शकतात, जाणून घ्या कारणे.
भात कसा साठवला आहे हे महत्त्वाचे असते; चुकीच्या साठवणुकीमुळे तो आरोग्यास हानिकारक ठरू शकतो.
शिळ्या भातात फायबर मुबलक असतो, जो पचन सुधारण्यात आणि आतड्यांच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरतो.
थंड झालेला शिळा भात खाल्ल्यास शरीराला थंडावा मिळते आणि उन्हाळ्यात तो शरीराला आराम देतो.
योग्य साठवलेल्या तांदळात नैसर्गिक प्रोबायोटिक्स तयार होतात, जे आतड्यांच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरतात.
शिळ्या भातात बुरशी आणि बॅक्टेरिया वाढू शकतात, ज्यामुळे अन्न विषबाधेचा धोका निर्माण होतो.
अयोग्य साठवलेल्या शिळ्या भातामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी होते आणि त्यामुळे आजारांची शक्यता वाढू शकते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.