Dhanshri Shintre
चुकीच्या सवयींमुळे मूत्रपिंड हळूहळू खराब होतात, पण सुरुवातीची सौम्य लक्षणं लक्षात न आल्याने धोका वाढतो.
म्हणूनच किडनीच्या आजाराला 'सायलेंट किलर' म्हणतात, कारण ते शरीरात शांतपणे नुकसान करत राहतात, लक्षणांशिवाय.
किडनीच्या आरोग्यासाठी भरपूर पाणी पिणे आवश्यक आहे, कारण पाणी कमी घेतल्यास मूत्रपिंडांवर अतिरिक्त ताण येतो.
सामान्य त्रासासाठी सतत वेदनाशामक औषधे घेणे धोकादायक ठरते, कारण ती किडनीवर गंभीर परिणाम करू शकतात.
अनेकांना वाटतं सिगारेट फक्त फुफ्फुसांना नुकसान करते, पण ती किडनीलाही हानी पोहोचवून आजाराचा धोका वाढवते.
अति साखर सेवनामुळे मधुमेह होतो, जो किडनी निकामी होण्याचं प्रमुख कारण आहे; त्यामुळे गोड खाणं टाळा.
लांब वेळ एकाच ठिकाणी बसल्याने चयापचय बिघडतो, साखर वाढते आणि त्यामुळे किडनीवर नकारात्मक परिणाम होतो.